Meet your Life Partner

Search Your World

Showing posts with label Lokmat News. Show all posts
Showing posts with label Lokmat News. Show all posts

Saturday, March 24, 2012

चोरांनी देव लुटला!

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगरच्या प्रसिध्द सुवर्णगणेश मंदिरात शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हैदोस घालून २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गणेश भक्तांच्या o्रध्देवरच दरोडा आल्याची भावना असून परिसरात दहशत आहे.
रात्री दरोडेखोरांनी सुवर्णगणेश मंदिराच्य मागच्या बाजूचे छपराची कौले काढून मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक महादेव घडशी (५५) आणि अनंत भगत (५0 ) या दोघांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला डावा साधला. यातील गंभीर जखमी महादेव घडशी यांचा आज दुपारी मृत्यू झाला तर अनंत भगत गंभीर आहेत.
शनिवारी सकाळी ६.३0 वाजता मंदिराचे पुजारी दिलीप तथा बाळू अभ्यंकर नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता त्यांना रखवालदार बेशुद्ध पडलेले दिसले. तसेच मंदिराच्या छपराची कवैलू काढलेले दिसले. अभ्यंकर यांनी लगेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली.
ट्रस्टचे पदाधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने .....परिसरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिर परिसरात जमू लागल्या. श्रद्धास्थानावरच दरोडा पडल्याने लोक संतप्त होते. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांमध्येही दहशत होती. थोड्याचवेळात घटनास्थळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाड विभागाचे उपविभागीय अधिकारी रविंद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, पोलीस निरीक्षक शुक्ला, प्रकाश बिराजदार, रासकर इ. अधिकारी तसेच ठसे तज्ञ, श्‍वान पथक येवून दाखल झाले. मंदिरात नाईट व्हीजन सी. सी. टी. व्ही. कॅमेरेही कार्यरत असल्यामुळे या दरोड्याचा तपास निश्‍चीत लागेल असा विश्‍वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

तिन्ही बाजूने समुद्रखाडीने नैसर्गिक विळखा घातलेल्या दिवेआगरमध्ये १७ नोव्हेंबर १९९७ ला द्रौपदी पाटील यांच्या सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्यात ही सव्वा फूट उंचीची सोन्याची गणपतीची मूर्ती आणि सोन्याचे दागिने सापडले होते.

Saturday, March 10, 2012

नवृत्ती..पण चटका लावणारी

बंगळूर। दि. ९ वृत्तसंस्था
कारकीर्दीतीाल शेवटीची कसोटी खेळून द्रविड परत पॅव्हेलियनमध्ये चालला आहे. संघातील सहकारी बॅट वर करून त्याला सलामी देत आहेत. अख्खे स्टेडियम टाळयांच्या गजरात त्याला मानवंदना देत आहेत.. पण द्रविडच्या वाटयाला असा दिमाखदार सोहळा आलाच नाही.
कारकीर्दीतची सुमारे १५ वर्ष मैदानावर रक्ताचे पाणी केल्यानंतरही द्रविडला मैदानाबाहेर बंद हॉलमध्ये निवृत्तीची घोषणा करावी लागते, यासारखे दुर्देव त्याचे नाही.
द्रविडच्या आजच्या निवृत्तीने गांगुलीने नवृत्ती घेतली ते दिवस नक्कीच सगळयांना आठवले असतील. २00८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेनंतर गांगुलीने संन्यास घेतला होता. चौथ्या कसोटीत धोनीने गांगुलीकडे काही काळासाठी नेतृत्वही दिले होते. खेळ संपल्यानंतर गांगुलीला टीम इंडियाने खांद्यावर घेत मैदानावर फिरवले.
टीम इंडियाची भिंत. असलेल्या द्रविडच्या नशिबी मात्र हे अविस्मरणीय क्षण नव्हते.. ही भिंत अनेक वेळ भारताची इभ्रत राखण्यासाठी खंबीरपणे एकाकी उभी राहिली. आणि शेवटही तशीच उभी राहिली.. एकाकी.

Wednesday, February 8, 2012

ठाकरे, पवारांनी 'उरकले' पुण्यातले 'रोड शो'

पुणे, दि. ८ - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ‘रोड शो’बंद गाडीतूनच उरकला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ध्यातच ‘रोड शो’ संपवून टाकल्याने पुण्यातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.
राज ठाकरे यांच्या रोड शोसाठी सकाळपासून कसबा गणपती मंदीर परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता नियोजित वेळ असलेला रोड शो सुरूच बारा वाजता झाला. नंतर शहराच्या मध्य भागातून सुरू झालेला ‘रोड शो’अक्षरश: पळवित नेण्यात आला.
कसबा गणपतीचे दर्शन घेऊन ठाकरे यांनी रोड शोला सुरूवात केली. उघडया गाडीतून ठाकरे फिरणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र प्रत्यक्षात ठाकरे बंद गाडीमध्ये बसले आणि रोड शोला सुरूवात केली. उशिर झाल्याने गाडी वेगाने पुढे जात असल्याने इतर गाडयांची आणि कार्यकर्त्यांची पुरती दमछाक होत होती. खुल्या जिप्सीमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि इतर उमेदवार होते. शोमध्ये महिला आणि तरूणांचा मोठा सहभाग होता.
चौकाचौकांमध्ये घोषणा देऊन, फटाके उडवत, फुले उधळत ठाकरे यांचे स्वागत करण्यात येत होते. हार-तुरे घेण्यासाठीच केवळ राज ठाकरे गाडीच्या काचा उघडत होते. त्यामुळे त्यांची छबी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांसह अनेक जण उत्सुक होते. रस्त्याच्या कडेच्या इमारतीमध्ये थांबून नागरिक राज ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी मोबाइल घेवून उभे होते. मात्र राज ठाकरे गाडीतून न निघाल्याने सर्वांची निराशा झाली.
कसबा पेठेतील सुर्या रूग्णालयापासून शोला सुरूवात झाली. साततोटी पोलीस चौकी, नरपतगीरी चौक, संत कबीर पोलीस चौकीमार्गे लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, शाहू चौक मागे जेधे चौकात गेली आणि तेथेच संपली. शहराच्या मध्यवर्ती भागातून रोड शो गेल्याने सगळीकडे वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या सव्वा तासात स्वारगेट येथील जेधे चौकात रोड शो संपला. रोड शोच्या मार्गात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘रोड शो’ नवी पेठ येथून सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भागातून ‘शो’ सुरू करण्यात आला. सकाळी साडे अकरा वाजल्यापासून कार्यकर्ते पवार यांची प्रतिक्षा करत होते. नरवीर तानाजी वाडी, विद्यापीठ परिसर, गोखलेनगर परिसरातून उघड्या जीपमध्ये असलेल्या अजित पवार यांच्यासोबत दुचाकीवरून मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते होते. सेनापती बापट रस्त्यावर हा ‘रोड शो’ अचानक संपविण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या समवेत संयुक्त सभेला उपस्थित राहण्यासाठी पवार मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले.

Friday, February 3, 2012

टीम इंडिया झाली बेसहारा

नवी दिल्ली, दि. ४ - पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियावर आता त्यांची प्रायोजक कंपनी असलेल्या सहारा इंडियाने प्रायोजकत्व मागे घेतल्याने 'बेसहारा' होण्याची वेळ आली आहे. टीम इंडियाचे प्रायोजकत्व मागे घेतानाच, आयपीएलमधील पुणे वॉरियर या संघाची मालकी सोडण्याची घोषणाही सहारा उद्योगसमूहाने केली आहे. इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या आवृत्तीसाठी युवराज सिंगच्या ऐवजी दुसरा खेळाडू मिळावा, ही मागणी सहाराने केली होती. पण ती मागणी फेटाळून लावल्याने कंपनीने तडकाफडकी हे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय अंतर्गत होणा-या सर्व क्रिकेट सामन्यांपासून आपण संबंध तोडत आहोत, अशी घोषणा सहाराच्या वतीने करण्यात आली.
सहाराचे टीम इंडियाशी झालेले मूळ कंत्राट २०१०मध्येच संपले आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर सहाराचा लोगो झळकवण्यासाठी भारतीय संघाला कंपनीकडून ३ कोटी ३४ लाख रुपये दिले जात होते.
दरम्यान, पुणे वॉरियर या संघाची मालकी तात्काळ अन्य इच्छुक कंपनीकडे सोपवावी, अशी विनंती सहाराने बीसीसीआयकडे केली आहे.

Thursday, February 2, 2012

२ जी घोटाळ्य़ाला सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्ली, दि. २-संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)या आधीच्या सरकारमधील दळणवळणमंत्री ए. राजा यांनी सरकारचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान करून ११ कंपन्यांना दिलेले २जी स्पेक्ट्रमचे सर्वच्या सर्व १२२ परवाने आज सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केले. मात्र या घोटाळ्य़ात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी पूर्वी वित्तमंत्री असताना बजावलेल्या कथित संशयास्पद भूमिकेचा तपास करण्याचा आदेश केंद्रीय गुप्तचर विभागास (सीबीआय) स्वत: न देता त्याचा निर्णय या घोटाळ्य़ाशी संबंधित खटला सुरु असलेल्या विशेष न्यायालयावर सोपविण्यात आला. तसेच या घोटाळ्य़ाचा तपास सीबीआय राजकीय दबावामुळे नीट करीत नसल्याने त्यासाठी न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली स्वतंत्र विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे ही मागणीही फेटाळून लावली.
देशातील उद्योग विश्‍वाला आणि विशेषत: चौखूर घोडदौड करणार्‍या टेलिकॉम उद्योगास मोठा दणका देणारे तसेच राजकीय पातळीवरही नजीकच्या भविष्यात खळबळ उडवू शकणारे असे हे निकाल न्या. जी. एस. सिंघवी आणि ए. के. गांगुली यांच्या खंडपीठाने २-जी घोटाळ्य़ाशी संबंधित तीन स्वतंत्र प्रकरणांमध्ये दिले. या निकालासह गेल्या काही महिन्यांत सरकारला दणके देणारे इतरही अनेक निकाल देऊन न्या. गांगुली आज नवृत्त झाले.
परवान्यांचे वाटप मनमानी पद्धतीने व म्हणूनच घटनाबाह्य पद्धतीने झालेले असल्याने ते रद्द केले जात असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. यापुढे २-जी परवाने कसे द्यायचे याविषयीच्या शिफारसी टेलिकॉम रेग्युलेटरी अँथॉरिटीने (ट्राय) महिनाभरात कराव्यात आणि त्यानुसार सरकारने लिलाव पद्धतीने स्पेक्ट्रमचे वाटप करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. रद्द झालेल्या परवान्यांवर संबंधित कंपन्या तोपर्यंत व्यवसाय करू शकतील, असेही स्पष्ट केले गेले. ज्या कंपन्यांनी राजांकडून हे परवाने स्वस्तात मिळाल्यानंतर ते इतरांना चढय़ा दराने विकले किंवा आपले भागभांडवल इतरांना विकले त्यांना अशा प्रत्येक परवान्यासाठी पाच कोटी रुपयांचा दंडही केला गेला. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही स्वयंसेवी संस्था, जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे.एम. लिंगदोह, टी. एस. कृष्णमूर्ती, एन. गोपालस्वामी व माजी केंद्रीय दक्षता आयुक्त पी. शेखर यांनी केलेल्या याचिकांवर हा निकाल दिला गेला.
ए. राजा दळणवळणमंत्री असताना जानेवारी २00८ मध्ये २-जी स्पेक्ट्रमचे लिलाव पद्धतीने वाटप न करता प्रथम येणार्‍यास पसंती या तत्त्वावर ११ कंपन्यांना एकूण १२२ परवाने दिले गेले होते. यातून सरकारला फक्त ९ हजार कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर केलेल्या ३-जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकारला तब्बल ६९ हजार कोटी रुपये मिळाले होते यावरून २-जी घोटाळ्य़ात सरकारला झालेल्या नुकसानीचा ँअंदाज येऊ शकतो. यात प्रत्यक्षात काहीच तोटा झाला नाही, असे सरकार सांगत असले तरी या घोटाळ्य़ात सरकारला मिळू शकणारा १.७६ लाख कोटी रुपयांचा संभाव्य महसूल बुडाला, असा अहवाल नियंत्रख व महालेखापालांनी (कॅग) दिला होता.
चिदम्बरम यांना दिलासा
लिलाव पद्धतीने स्पेक्ट्रमचे वाटप करायचे धोरण असूनही ए. राजा त्यानुसार न वागता परवाने देण्याच्या बेतात आहेत, याची त्यावेळी वित्तमंत्री असलेल्या पी. चिदम्बरम यांना कल्पना होती. राजा यांनी परवान्यांचे मूल्यांकनही चिदम्बरम यांच्याच सल्ल्याने केले होते. चिदम्बरम यांनी मनात आणले असते तर ते राजा यांना वेळीच रोखू शकले असते, असा आरोप करून यासंदर्भात चिदम्बरम यांच्याविरुद्ध तपास करण्याचा आदेश सीबीआयला द्यावा, अशी आणखी एक याचिका डॉ. स्वामी यांनी केली होती. ती अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने असा कोणताही आदेश स्वत: देण्यास नकार दिला. या घोटाळ्य़ाशी संबंधित खटला चालविणारे विशेष न्यायालय या संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम असल्याने त्या न्यायालयाने, आम्ही या निकालपत्रात केलेल्या मतप्रदर्शनाने प्रभावित न होता, यावर दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यापुढे याविषयीची सुनावणी पूर्ण झाली असून ते येत्या शनिवारी निकाल देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चिदम्बरम यांना तूर्तास दिलासा मिळाला असला तरी त्यांना पूर्ण क्लीन चिट
मिळणार की नाही हे दोन दिवसांनी ठरेल.

एसआयटी नाही
न्यायालयाने आज निकाल दिलेली तिसरी याचिका ज्येष्ठ वकील व टीम अण्णाचे प्रमुख सदस्य प्रशांत भूषण व डॉ. स्वामी यांनी केली होती. २-जी घोटाळ्य़ाच्या तपासासाठी न्यायालयाने स्वत:च्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी त्यांची मागणी होती. ती अमान्य करण्यात आली. त्याऐवजी सीबीआयने यापुढील तपासातील प्रगतीचा अहवाल सीव्हीसींना द्यावा व सीव्हीसींनी त्या अनुषंगाने विशेष न्यायालयास मदत करावी, असा आदेश दिला गेला.

मॅन ऑफ द सिरिज

हा खटला एकाकी लढणारे आणि खटल्यामागून खटला जिंकत चाललेले सुब्रह्मण्यम स्वामी हे मॅन ऑफ द मॅच नव्हे, तर मॅन ऑफ द सिरिज आहेत, असे नेमके वर्णन रामास्वामी यांनी व्यक्त केले.

सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान किंवा चिदंबरम यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नाही. स्पेक्ट्रम वाटपाचे धोरण भाजपाच्या एनडीए सरकारच्या काळातले होते. आम्ही ते फक्त राबवले.
- कपिल सिब्बल

चिदंबरम यांना दिलासा अन् दणकाही
ए. राजा हे स्पेक्ट्रमचे वाटप लिलाव पद्धतीने करणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने चिदंबरम यांना होती. त्यांनी मनात आणले असते तर हा घोटाळा रोखता आला असता. त्यांच्या संशयास्पद भूमिकेचा सीबीआय तपास करण्याचा आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, त्यांच्यावर खटला चालवण्याचा निर्णय घेण्यास विशेष न्यायालय सक्षम असल्याचे सांगितले. व यासंदर्भात दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी सुनावणी पूर्ण केली असून, ते शनिवारी निकाल देतील, अशी अपेक्षा आहे.

मोबाईल सुरू राहणार!
मनोज गडनीस। दि. २ (मुंबई)
सर्वोच्च न्यायालयाने परवाने रद्द केल्यानंतर आता घोटाळेबाज कंपन्यांच्या मोबाईल सेवा सरसकट बंद होतील, ही भीती निराधार आहे. न्यायालयाने २-जी स्पेक्ट्रमच्या पुनर्वाटपासाठी चार महिन्यांचा अवधी दिला असून, या काळात या मोबाईल सेवा सुरू राहतील. पुन्हा या कंपन्यांनी स्पेक्ट्रम खरेदी केला, तर विद्यमान ग्राहकांना अडचण येणार नाही. नव्याने होणार्‍या लिलावात या कंपन्या सहभागी झाल्या नाहीत तरीही ग्राहकांना मोबाईल नंबर पोर्टेब्लिटीचा पर्याय खुला आहे. एका सर्वेक्षणानुसार घोटाळेबाज कंपन्यांच्या सुमारे साडेचार कोटी ग्राहकांपैकी सव्वातीन ते साडेतीन कोटी ग्राहक मोबाईल नंबर पोर्टेब्लिटीचा पर्याय स्वीकारू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश..

राजा यांनी जानेवारी २00८मध्ये वाटलेले २ जी स्पेक्ट्रमचे १२२ परवाने रद्द.

टाटा टेलि., एटिलसेट, युनिटेक सिस्टिमा शाम आणि एस टेल यांना प्रत्येक सेवा विभागासाठी ५ कोटींचा दंड.

लूप प्रत्येक लायसन्ससाठी पाच कोटींचा दंड.

एस टेल, अलायन्झ यांना प्रत्येकी ५0 लाखांचा दंड.

एकत्रित दंडापोटी या कंपन्यांना ४४५ कोटी रुपये भरावे लागणार.

ट्रायच्या शिफारशीने २-जी परवान्यांचा लिलाव ४ महिन्यांत करा.

नव्याने वाटप होईपर्यंत रद्द परवान्यांवर व्यवसायाची कंपन्यांना मुभा

सुनो २-जी

सर्वोच्च न्यायालयाने आज १0 मोबाईल कंपन्यांचे एकूण १२२ परवाने रद्द केले. याचा मोठा फटका या कंपन्यांना बसेल. देशातील ९0 कोटी मोबाईल ग्राहकांपैकी
५ टक्के मोबाईल ग्राहकांच्या खिशात घोटाळेबाज कंपन्यांचेच मोबाईल आहेत. त्यात तुम्ही तर नाही?..
पण, घाबरू नका!

युनिनॉर- संपूर्ण भारतासाठी परवाना, त्यापैकी २२ राज्यांत कार्यरत.
लूप - मुंबई वगळता संपूर्ण भारतासाठी परवाना, त्यापैकी २१ राज्यांत कार्यरत.
सिस्टिमा शाम - राजस्थान वगळून संपूर्ण भारतासाठी परवानगी, त्यापैकी २१ राज्यांत कार्यरत.
टाटा - आसाम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील राज्य
एटलसॅट डीबी - बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मुंबई, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश (पूर्व-पश्‍चिम दोन स्वतंत्र परवाने)

एस.टेल - आसाम, ईशान्येतील राज्ये, बिहार, ओरिसा, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर
व्हिडीओकॉन - पंजाब वगळता २१ राज्यांत कार्यरत
आयडीया - आसाम, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कोलकाता, ईशान्येतील राज्ये, ओरिसा, पंजाब, तामिळनाडू, प. बंगाल
स्पाईस (आयडीया) - महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली,
हरियाणा.

सिब्बल म्हणतात चिदंबरम निर्दोष

नवी दिल्ली, दि. २ - टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये केंद्र सरकारला दोषी धरलेले असताना दूरसंचार मंत्री यांनी आधीच्या म्हणजे भारतीय जनताप्रणीत एनडीए सरकारला जबाबदार धरले आहे. आमच्या सरकारने आधीच्या सरकारने आखलेली धोरणे पुढे सुरू ठेवल्याचा पवित्रा सिब्बल यांनी घेतला आहे. तसेच तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये काहीही संबंध नव्हता असेही स्पष्ट केले आहे. ए. राजा दूरसंचार मंत्री असताना टू-जी स्पेक्ट्रमचे घटनाबाह्य पद्धतीने वाटप झाले होते आणि सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागला होता.
सर्वोच्च न्यायालयाने स्पेक्ट्रम वाटपासंबधी आदेश दिले असून आता दूरसंचार नियामक मंडळाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येईल असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

Sunday, January 15, 2012

बनावट नोटा दुप्पट महागल्या!

जयेश शिरसाट। दि. १४ (मुंबई)
आंतरराष्ट्रीय विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरत असले तरी बनावट नोटांच्या बाजारात मात्र, रुपया वधारला आहे. पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बनावट नोटा दुप्पट महागल्याने या धंद्यातील व्यक्तींना घाम फुटला आहे, असे पश्‍चिम बंगालमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पश्‍चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हय़ातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने खास ‘लोकमत’ला ही माहिती दिली. त्यानुसार पूर्वी २५ ते ३0 रुपयांना मिळणारी शंभराची बनावट नोट सध्या ५0 ते ५५ रुपयांना विकली जात आहे. बनावट नोटांविरोधात मुर्शिदाबाद, मालदा, नदीया, चोबीस परगणा या जिल्हय़ातील बांग्लादेश सीमेवरल्या खेड्यांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईतून ही भाववाढीची बातमी फुटली.
या भाववाढीमुळे बनावट नोट मुंबईत येईपर्यंत ९0 ते ९५ रुपयात पडत असल्याने बनावट नोटांच्या व्यवहारांचे प्रमुख केंद्र असलेल्या पश्‍चिमबंगाल-बांग्लादेश सीमेवर देशी-परदेशी एजंटांमध्ये मोठी ‘बार्गेनिंग’ सुरू
आहे. भाववाढले असले तरी बनावट नोटांचा सुळसुळाट काही थांबण्याचे नाव घेत नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.
सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने बनावट नोटावाल्यांना सुगीचे दिवस आहेत. निवडणुकांत बनावट नोटांची मागणी लक्षात घेऊन बांग्लादेशी एजंटांनी ही भाववाढ केल्याची शक्यता आहे.

Friday, January 13, 2012

जे महाजनांच्या घरात झाले ते मुंडेंना आपल्या घरात करायचेय का?

 ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांचा पत्रकार परिषदेत सवाल.
- काका-पुतण्याची संपली आता भावा-भावात रंगली शाब्दिक चकमक.

बीड। दि. १२ (प्रतिनिधी)
आम्हाला घर तोडायचे नाही आणि पक्षही सोडायचा नाही, परंतु जर मुंडेंची इच्छाच आमच्या घरात राहायचे आणि आम्हाला पक्षातून काढायचे असेल तर आमचा नाईलाज आहे. आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या तोंडचे ऐकून मुंडेंना जे महाजनांच्या घरात झाले ते आपल्या घरात करायचे आहे का,असा भावनिक सवाल खा. गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
मुंडे परिवारातील वादापासून आतापर्यंत पडद्याआड राहिलेले खा. मुंडे यांच्या ज्येष्ठ बंधूंनी आता थेट मैदानात येऊन आपल्या भावना बोलून दाखविल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय आता आमच्यात नात्याचे राहिलेयच काय ? असा सवालही त्यांनी केला. आम्ही भाजप सोडला नाही. पण आम्हाला काढायचेच ठरविले तर आमचे रस्ते मोकळे आहेत. आता पक्षाच्या भूमिकेमुळे आम्ही अर्ज भरावे की नाही असे वाटते. तरी आम्ही प्रतीक्षेत आहोत. आतापर्यंत मुंडेच्या मागे उभा होतो, आता धनंजयच्या मागे उभा राहीन. जर जि. प. त अपेक्षाभंग झाला तर काहीही करू, असे सुनावत त्यांनी स्वतंत्र आघाडीच्या चर्चेबाबत हिरवा सिग्नल दिला.

पंडितअण्णा उवाच..
मी गोपीनाथला घडविले?
- गोपीनाथ ११ वीला असताना आमच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून मी त्याला सांभाळले. मग ‘गोपीनाथला मी घडविले की गोपीनाथने मला ?’ याचा विचार तुम्हीच करा. मी माझी ४0 वर्षे आणि धनंजयने स्वत:ची १५ वर्षे गोपीनाथला दिली, हे तरी लक्षात घ्या. ते कर्तृत्ववान आहेत, म्हणून मी ज्येष्ठ भाऊ असूनही मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे सावलीसारखा वावरलो.

धनंजयला नितीन गडकरींनी आमदार केले ?
- धनंजयला आमदार गोपीनाथरावांनी नाही तर नितीन गडकरींनी केले. धनंजयच्या उमेदवारीची घोषणा झाली तेव्हा खा. मुंडे परदेशात होते. भाजपाबरोबर राष्ट्रवादीची मते मिळवित धनंजय विधान परिषदेचे आमदार झाले. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत मी चार-चार विनंत्या केल्यावर शेवटचे तीन दिवस ते आले. उलट विधानसभेला धनंजयला सोडून पंकजाला तिकिट दिल्याची घोषणा मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन केली होती ती घर तुटू नये म्हणूनच. शिवाय तिला २५ हजारापेक्षा जास्त मतांनी म्हणजे गोपीनाथरावांपेक्षा जास्त मतांनी निवडून आणले. तुम्ही तर जुगलकिशोरला घरात दत्तक घेतल्यासारखे त्याच्या अध्यक्षपदासाठी अडून बसले ना !

मुंडेसाठी मी आणि धनंजयने वार झेलले?
- आम्ही खा. गोपीनाथसाठी आमच्या अंगावर वार झेलले. ९९ च्या विधानसभेला घाटनांदूरमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. माझे जाऊ द्या, धनंजयवर ३0७ च्या तेरा पोलिस केस आहेत. तो आणि मी दोघेही कोर्टाच्या वार्‍या करतो आहोत. ही सारी राजकीय भांडणे होती, जी आम्ही गोपीनाथसाठी केली. मी माझा मुलगा वयाच्या २0 व्या वर्षी गोपीनाथला राजकारणासाठी दिला. त्याला २३ व्या वर्षापासून शुगर, बी.पी. सारखे आजार दिले.

धनंजय स्वत:च्या कत्र्वृत्वाने पुढे गेला?
- धनंजयच्या राजकीय वाटचालीत गोपीनाथपेक्षा त्याचे कर्तृृत्वही आहे. मुंडेंचा पुतण्या म्हणून पदे मिळाली असती तर थेट भाजयुमोचे राज्य - राष्ट्रीयचे अध्यक्षपद का मिळाले नाही ? आधी उपाध्यक्ष, मग सरचिटणीस आणि नंतर प्रांताध्यक्ष अशी चढती कमान धनंजयच्या कामामुळे पदे मिळाल्याचेच सांगते. आमदार करण्यातही त्यांच्यापेक्षा नितीन गडकरींचाच वाटा मोठा आहे. खोटं वाटलं तर लावू का फोन ?

माझ्या घरात आई आहे, तिला तरी भेटला का?
- आम्ही गोपीनाथच्या घरी पाचशेवेळा गेलो. शंभरवेळा विनंत्या केल्या. पण ते आमच्याकडे येत नाहीत. ते परळीला शंभरवेळा आले. पण, माझ्या घरात आई आहे. तिला भेटायला तरी आला का ? फक्त माझ्या घरात आहे म्हणून स्वत:च्या आईलाही भेटावे वाटत नाही का ?

गोपीनाथची पत्नी मला ढोंगी म्हणते..!
- मी आजारी पडून पुण्याच्या रुग्णालयात जीवन-मरणाशी संघर्ष करीत होतो आणि गोपीनाथची पत्नी मला आजारबिजार नाही तर ढोंग करतात म्हणाली. मला गोपीनाथ भेटायला कधी आला ? मी सून म्हणून घरात तिचे स्वागत केले आणि मुलगी म्हणून मान दिला ना.

नाते तुटल्याची गोपीनाथची एकतर्फी घोषणा
- नाते तुटल्याची घोषणा आम्ही केली नाही. भगवानगडावर मेळावा घेऊन गोपीनाथने एकतर्फीच सांगितले. समाजाचा एवढा पुळका आहे तर मग परळी नगरपरिषदेतला समाजाचा एकतरी नगरसेवक मागे आहे का ?

भगवानगडावरून राजकारण का ?
- मी भगवानगडावरून राजकारण करीत नाही, अशी घोषणा खा. मुंडेंनी अनेकवेळा केली. पण गडाचा प्रत्येक वेळी राजकीय वापर केला. हा कालचा मेळावा त्याचीच साक्ष आहे. हा खोटारडेपणा का करता ?

Tuesday, January 10, 2012

टीम अण्णा उतरणार प्रचारात!

कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही

राळेगणसिद्धी। दि. १0 (वृत्तसंस्था)
टीम अण्णाने अखेर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे जाहीर केले खरे; मात्र, त्याच वेळी प्रचार हा कोणत्याही एकाच पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने असणार नाही, हे देखील स्पष्ट केले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर न झाल्यास पाच राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसविरोधात प्रचार करण्याची घोषणा अण्णांनी केली होती. त्यानंतर मुंबईतील उपोषणाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तसेच प्रकृती बिघडल्याने अण्णांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अखेर, अण्णा हजारेंशी चर्चा केल्यानंतर प्रचारात उतरण्याचा निर्णय टीम अण्णाने घेतला. भूषण म्हणाले की, लोकपालवर सरकारने सर्वाधिक वेळा विश्‍वासघात केला; परंतु, अन्य राजकीय पक्षांचे वर्तनही योग्य नव्हते. प्रचारात यावर आम्ही भर देऊ. या वेळी अरविंद केजरिवालही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Friday, January 6, 2012

तिरुपतीच्या दारी पासेसची 'हेराफेरी'

तिरुमला, दि. ६ - देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुपती देवस्थान हजारोंच्या संख्येने व्हीआयपी पासेसची खिरापत वाटल्याप्रकरणी वादाच्या भोव-यात सोपडले आहे. गुरुवारच्या वैकुंठ एकादशीनिमित्त करण्यात आलेली व्यवस्था ढिसाळ होती असा आरोप करण्यात येत असतानाच पासेसच्या वितरणावरुनही नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यासाठी नेहमी ५०० रुपयांना व्हीआयपी पास देण्यात येतो. यावेळी या महत्त्वाच्या व्यक्तिंच्या पासेसखेरीज व्हीव्हीआयपी किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी १००० रुपयांचे पास देण्यात आले. यातली आणखी खेदाची बाब म्हणजे ५०० रुपयांचे पास पाच ते १० हजार रुपयांना भलत्याच लोकांना विकण्यात आले. याप्रकारे सुमारे १० हजार पासेस विकण्यात आल्याचे सूत्रांचे सांगणे असून तिरुपती देवस्थानच्या अधिका-यांच्या सहभागाशिवाय या प्रकारचा गैरव्यवहार होणे शक्य नसल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.
तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापनाबाबत अनेक प्रतिष्ठितांनीही नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट अभिनेता मोहन बाबू, काँग्रेसचे खासदार रायापती सांबाशिवा राव आणि आमदार के रामकृष्ण यांनी देवस्थानचे व्यवस्थापन आतापर्यंतचे सर्वात ढिसाळ असल्याची टीका केली आहे. अनेक व्हीआयपींमुळे संपूर्ण परीसरात वाहतूक ठप्प झाली तर अनेक भक्तांची राहायची तर सोडाच साध्या दर्शनाचीही सोय झाली नाही. विशेष म्हणजे यावेळी व्हीआयपी पास देणार नाही असे जाहीर केलेल्या देवस्थानने प्रत्यक्षात मात्र इतके व्हीआयपी पासेस विकले की अनेक ख-या व्हीआयपींना दर्शनासाठी प्रचंड ताटकळावे लागले. व्हीआयपी कोट्याचा विचार केला तर केवळ सहा मंत्री, चार न्यायाधीश आणि दोन केंद्रीय मंत्री खरेतर उपस्थित होते. संपूर्ण व्हीआयपी कोटा जरी विचारात घेतला तरी ती संख्या ३०० पेक्षा जास्त नसते, परंतु यावेळी प्रत्यक्षात मात्र हजारोंच्या संख्येने व्हीआयपी पासधारक आले होते. त्यामुळे जे व्हीआयपी नाहीयेत अशांनाही हे पासेस विकण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे एक आमदार मुद्दूकृष्णा नायडू यांनी व्यक्त केली.
हा सगळा गोंधळ पहाटे दोनच्या सुमारासच सुरू झाला. दोन वाजता व्हीआयपींचे दर्शन सुरू झाले, जे चार वाजता संपणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मात्र सहा वाजून गेले तरी व्हीआयपींची रांगच संपेना. त्यामुळे व्हीआयपी आणि साधारण अशा दोन्ही भक्तांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागले. एकवेळ तर अशी आली की पोलीसांनाही व्हीआयपींच्या रांगेवर नियंत्रण राखणे अशक्य झाले आणि साधारण भक्तदेखील गर्दीचा नी ढिसाळ व्यवस्थापनाचा फायदा घेत व्हीआयपींच्या रांगेत घुसले. याबरोबर व्हीआयपी नसलेल्या व्यक्ती आपल्या रांगेत घुसताहेत अशी आरडाओरड व्हीआयपींनी सुरू केली. या सगळ्याचा परिणाम मात्र अनेक ख-या भाविकांसाठी मात्र त्रासदायक ठरला. पायी संपूर्ण टेकडी चढून गेलेल्या अनेक भक्तांना देवाचे दर्शन न घेताच माघारी यावे लागले.

Monday, December 26, 2011

अण्णांना काँग्रेसचा सबुरीचा सल्ला

ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अशक्त लोकपाल विरोधातील उपोषणाच्या पुर्वसंध्येला सरकारने त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला म्हणाले की, अण्णांनी आपले आंदोलन सुरु करण्यापूर्वी संसदेत होणार्‍या चर्चेच्या निष्कर्षाची प्रतिक्षा करायला हवी. सर्वांनी लोकपालाचा निर्णय संसदेवर सोडायला पाहिजे कारण यावेळी ते संसदेच्या कार्यक्षेत्रात आहे. सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. प्रत्येक जण यावर मंथन करीत आहे. संसदच विधेयकाचे भाग्य निश्‍चित करेल, असा दावा करताना शुक्लांनी अण्णांना संसदेच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, काँग्रेसने अण्णा हजारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांवर नवा पवित्रा घेतला आहे. संघाशी संबंध असल्याचा आरोप अण्णांवर होताच भाजप त्यांच्या बचावासाठी पुढे का सरसावते? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. पक्ष प्रवक्ते राशिद अल्वी म्हणाले की, जेव्हाही अण्णांचा दृष्टीकोन भाजप व संघासारखा असल्याचा आरोप होतो तेव्हा हेच त्याचे स्पष्टीकरण देतात. अण्णा तसेच संघ यांच्यातील या समीकरणामुळे मी अचंबित होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.



Source : http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-26-12-2011-17959&ndate=2011-12-27&editionname=main

अण्णा कि आवाज देश कि आवाज

देश को भ्रष्टाचार मुक्त बनाना, भ्रष्टाचार को जड से उखाडना ये आम जनता की आवाज है. अण्णा ये आवाज को उठा रहे है. जनता के लिये लढ रहे है. इसलीये हम अण्णा के नेतृत्वमे यहा अनषन के लीये आये है. अनशन खत्म होने के बाद हम खुद को पुलीस के हवाले कर देंगे और उसके आगे अण्णा जो आदेश देंगे वही हम करेंगे, हरियाणाच्या गोहाना जिल्हय़ातून दुपारीच एमएमआरडीए मैदानावर दाखल झालेले पंडित विजयकुमार पुलस्त्य भावना व्यक्त करत होते.
विजयकुमार यांच्याप्रमाणे हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधून हजारो किलोमिटरचे अंतर तुडवत अण्णांचे, भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे पाठिराखे एमएमआरडीए मैदानात दाखल होत आहेत. पाठिशी मोजक्या कपड्यांची बॅग, हाती तिरंगा, डोक्यावर मी अण्णाची टोपी, छातीवर अण्णांचा फोटो असलेले बॅज लावून मैदानात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, अण्णा हजारे झिंदाबाद, अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे
साथ हैचे नारे देत सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
अण्णांच्या मनातले लोकपाल विधेयक पारित होत नाही तोपर्यंत अण्णा जिथे कुठे आंदोलन करतील तेथे आम्ही त्यांच्यासोबत असू, असा विश्‍वास पुलत्स्य आणि त्यांच्यासोबत अरियाणाहून आलेल्या सत्यनारायण पांचाळ, रविंद्र मेहरा यांनी व्यक्त केला. हे तिघेही अण्णांसोबत जंतरमंतर, रामलिला मैदानात उपोषणात सहभागी होते. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे मुंबई अध्यक्ष भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हरियाणाप्रमाणे, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि अन्य राज्यांमधील आम जनता मुंबईत धडकली आहे. आम्ही नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आहोत. अण्णा तीच लढाई लढत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा आहे, असे उलेमा काऊन्सीलचे मौलाना मेहमूद दर्याबंदी यांनी सांगितले.


-या मैदानाबाहेरील व्यवस्था पोलिसांकडे तर अंतर्गत व्यवस्थेची जबाबदारी टीम अण्णाकडे आहे. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला या दोन्ही यंत्रणा आपापल्या जबाबदार्‍या चोख पार पाडण्यासाठी लगबगीत दिसत होत्या. विशेष शाखेचे बॅज आणि साध्या कपड्यातले असंख्य पोलीस मैदानात, मैदानाबाहेर सुरक्षाचा आढवा घेत होते. दुसरीकडे कार्यकर्ते स्टेज, व्हीआयपी प्रवेशद्वार, कलाकार-माध्यमांसाठीचे स्टेज, सीसीटीव्ही, वॉच टॉव्हर्स या व्यवस्थेत मग्न होते.

-मैदानाभोवती ५0 सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस आणि टीम अण्णाचे स्वतंत्र, सुसज्ज नियंत्रण कक्ष, वॉकीटॉकी, प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

मीडियावर करडी नजर
राजकीय किंवा सामाजिक नेत्यावर चप्पल भिरकावणे किंवा त्याला मारहाण करणे हा प्रकार उपोषणाला बसणार्‍या अण्णांसोबत होऊ नये यासाठी टीम अण्णाने विशेष दक्षता घेतली आहे. उंच स्टेज, स्टेजपासून आंदोलकांना ५0 फुट दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. मात्र या दरम्यान माध्यमांसाठी एक स्टेज उभारण्यात आले आहे. आतापर्यंतचे हल्ले माध्यमप्रतिनिधी बनून आलेल्यांनीच केल्याने स्टेजवर आणि वार्तांकनासाठी मैदानात भटकणार्‍या पत्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईत दक्षतेचा इशारा
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एमएमआरडीएच्या मैदानावर होत असलेल्या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आली आहे. आंदोलनस्थळाचे परिसर व मार्गावर सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तीन दिवस २४ तास तैनात करण्यात आला आहे. कायदा हातात घेणार्‍या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकपाल विधेयकाबाबत आण्णा हजारे उद्यापासून तीन
दिवस एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषण करणार आहेत. या आंदोलनामुळे कायदा व सूव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. मैदानातील सुरक्षेची जबाबदारी एमएमआरडीएवर असली तरी साध्या वेषात पोलीस असणार आहेत.

जेलभरोसाठी पोलिसांची खबरदारी
अण्णा हजारेंच्या तीन दिवसांच्या उपोषणानंतर ३0 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होणार्‍यांची स्थानिक पोलीस ठाण्यात केवळ नाव नोंदणी घेवून त्यांना तात्पुरती अटक केली जाईल, हिंसक कृत्य झाल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल.
- रजनीश सेठ, पोलीस सहआयुक्त

Thursday, December 22, 2011

‘मालेगाव के शोले’ का खर्चा पचास हजार, कमाई दो लाख


मुंबई। दि. २२ (प्रतिनिधी)
‘अमितजी और रमेश सिप्पी साहब मुझे माफ करना. आपके ‘शोले’ का नाम लेके मैने ‘मालेगाव के शोले’ फिल्म सिर्फ पचास हजार रुपये मे बनाई और दो लाख रुपये कमाये..’ मनोरंजन विभागातून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरलेला शेख नासीर शेख नियाजच्या या भाष्यावर सभागृहात खळखळ उडाली आणि खुद्द अमिताभ बच्चन यांनीही त्याला मनापासून दाद दिली.
तीन राष्ट्रीय पारितोषिके मिळवणारे चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी शेख नासीर शेख नियाज याची विजेता म्हणून घोषणा केली आणि मालेगावमध्ये मॉलीवूड प्रतिचित्रसृष्टी निर्माण करणारा शेख नासीर टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर आला.
राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘या पुरस्कारायोग्य समजल्याने मी ज्युरींचा आणि जनतेचा आभारी आहे. त्याचबरोबर माझी आई, बहीण आणि मित्रांचेही मला आभार मानले पाहिजेत.
चित्रपटाचे आकर्षण सर्वांनाच असते. मीही एक त्यातलाच. पार्लरमध्ये काम करता करता मी चित्रपटनिर्मितीकडे कधी वळलो ते मला समजलेच नाही. मालेगावात राहून चित्रपट का तयार करू शकत नाही, असे मला राहून राहून वाटत होते. त्याच अस्वस्थेतून ‘मालेगाव के शोले’ तयार केला. प्रेक्षकांची वाहवा मिळाली. त्यातून स्फूर्ती मिळाल्याने ‘मालेगाव का सुपरमॅन’ची निर्मिती झाली. आतापर्यंतच्या लहानशा वाटचालीची दखल घेत लोकमतने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
खरे म्हणजे या पुरस्काराने माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या डोळ्यांत चित्रपटांबद्दलची अनेक स्वप्ने फेर धरून नाचताहेत. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढचे पहिले पाऊल म्हणजे मालेगाव का स्पायडरमॅनची निर्मिती. ज्या दिवशी तो पडद्यावर झळकेल, तेव्हा त्यापुढच्या चित्रपटनिर्मितीला मी लागलेला असेन.