नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कसोटी क्रिकेटकडे लक्ष देण्याचा, सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम याने दिला आहे.
अक्रम म्हणाला, ''सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडावे, त्यामुळे निवड समितीलाही विचार करायला वेळ मिळेल. निवड समितीच्या सदस्य त्याला वगळण्यास घाबरतात. सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडून कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्यावे. सचिनची सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खराब कामगिरी होत असली तरी, त्याला वगळण्याचे धाडस कोणी करीत नाही. सचिनने शतकांच्या शतकाबाबत विचार करणे सोडून दिले पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहिले, तर शतकेही होतील.''
अक्रम म्हणाला, ''सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडावे, त्यामुळे निवड समितीलाही विचार करायला वेळ मिळेल. निवड समितीच्या सदस्य त्याला वगळण्यास घाबरतात. सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडून कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्यावे. सचिनची सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खराब कामगिरी होत असली तरी, त्याला वगळण्याचे धाडस कोणी करीत नाही. सचिनने शतकांच्या शतकाबाबत विचार करणे सोडून दिले पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहिले, तर शतकेही होतील.''

0 comments:
Post a Comment