Meet your Life Partner

Search Your World

Sunday, March 18, 2012

मुंबईकरांच्या खिशाला कात्री,टॅक्सीच्या भाड्यात वाढ

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेटनंतर मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत टॅक्सीचीही भाडेवाढ होणार आहे.

एमएमआरटीएच्या निर्णयानुसार टॅक्सीचं भाडं एक रुपयाने वाढून सतरा रुपये होणार आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाड्यात ५० पैशांची वाढ होणार आहे.

नवी मुंबईतील रहिवाशांसाठी मात्र दिलासा देणारी बातमी आहे. नवी मुंबईत रिक्षाचं भाडं कमी करण्यात आलं आहे.

रिक्षा भाडं १५ रुपयांवरुन ११ रुपये करण्यात आल्याने नवी मुंबईकरांना तेवढंच हायसं वाटलं आहे.

0 comments:

Post a Comment